बीड : एक धक्कादायक बातमी आहे, बीड जिल्ह्यातील केज तालुक्यात बारावीच्या गणिताच्या पेपरच्या उत्तरपत्रिकाच आगीत जळून खाक झाल्या आहेत. मात्र आगीचं कारण अजून कळू शकलेलं नाही.


१ हजार १९९ उत्तरपत्रिका जळून खाक


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ही घटना केज शहरातील गट साधन केंद्रातील आहे. आज संध्याकाळी ही आग लागली. या आगीत बारावीच्या आजच्या गणित पेपरच्या १ हजार १९९ उत्तरपत्रिका जळून खाक झाल्या. 


शिक्षण विभाग यावर कोणता निर्णय घेणार


शिक्षण विभाग या विद्यार्थ्यास संदर्भात कोणता निर्णय घेणार, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. १ हजार १९९ विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका जळून खाक झाल्याचं सांगण्यात येत आहे.