औरंगाबाद : एका विवाहितेला नवऱ्याने जाळून मारल्याची घटना समोर आली आहे. महिलेने मृत्यूपूर्वी पती छळ करत असल्याचे सांगितल्यामुळे पतीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. औरंगाबादमध्ये पाडेगाव भागात राहणारे हिना आणि रफिक यांचा अडीच महिन्यांपूर्वी विवाह झाला होता. त्यांच्यात सुरुवातीपासूनच कुरबुरी आणि भांडणे होत होती.


सोमवारी हीना यांना पती रफिक शेख गफूर याने जळलेल्या अवस्थेत घाटी रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. मात्र मृत्यूपूर्वी दिलेल्या जबाबात पती त्रास देत असल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यानंतर पती विरोधात हत्येचा गुन्हा दाखल केल्याचे उपनिरीक्षक अतुल कुमार ठोकळ यांनी दिली.