जळगाव : जळगाव जिल्हा कारागृहात दंगलीतील कैद्याचा मृत्यू झालायं. रावेर तालुक्यातील आंदळवाडी इथला रहिवासी असलेला रवींद्र गंभीर कोळी हा कैदी दंगलीतील संशयित म्हणून कारागृहात होता. रात्री या कैद्याला त्रास होऊ लागला. मात्र उपचाराअभावी त्याचा मृत्यू झालायं. त्रास होत असतानाही कारागृह प्रशासनाने वेळीच उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात न हलवल्याने त्याचा मृत्यू झाला असा आरोप रवींद्र कोळीच्या नातेवाईकांनी केलाय. त्यामुळे कारागृह प्रशासन संशयाच्या घेऱ्यात सापडलंय.