सांगली : राष्ट्रवादीचं चिन्हं घड्याळ असलं तरी शिवसेना आणि हाताच्या नादाला लागल्यापासून वेळ चुकायला लागलीये, अशी मिश्किल टिप्पणी जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी केली. सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेतर्फे पाटील यांच्या हस्ते पुरस्कार वितरण झालं. मात्र कार्यक्रमाला उशिरा पोहोचल्याबद्दल माफी मागताना त्यांनी टोलेबाजी करताच उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राज्यमंत्री विश्वजित कदम यांची वाट बघत बसल्यामुळे विलंब झाल्याचं सांगताना जयंत पाटील यांनी मित्रपक्षांची कशी फिरकी घेतली, ऐकूयात..