कल्याण : कल्याण डोंबिवली पत्रकार संघातर्फे आयोजित 'दिलखुलास संवाद' कार्यक्रमात महापौर राजेंद्र देवळेकर आणि त्यांच्या पत्नी अनघा देवळेकर यांच्याशी कल्याण डोंबिवलीतील नामवंत   पत्रकार आणि नागरिकांनी संवाद साधला..


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यावेळी महापौरांनी शहर विकास, सतत भेडसावणारे नागरी प्रश्न, महापालिकेची स्थिती, भविष्यातील योजना यांसारख्या अनेक महत्वाच्या विषयांवर आपले विचार मांडले. तसेच कौटुंबिक स्तरावरील अनेक प्रश्नांचीही मनमोकळी उत्तरे दिली.त्यांच्या पत्नी अनघा देवळेकर सुद्धा या कार्यक्रमात सहभागी झाल्या होत्या..त्यांनी सुद्धा दिलखुलास पणे प्रश्नांना उत्तरे दिली..



यावेळी महापौरांकडून आपली अपेक्षा व्यक्त करताना त्यांच्या पत्नी अनघा यांनी कल्याण रेल्वे स्थानक परिसर स्वच्छ करणे,बेशिस्त रिक्षा चालकांपासून परिसर मोकळा ठेवणे  आणि एसटी डेपोच्या विचित्र प्रवेशद्वारामूळे वाहतुकीला होणारा त्रासावर तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली. त्यावर उत्तर देताना महापौरांनी यासंदर्भात आपले काम सुरू असून येत्या काळात सकारात्मक बदल दिसतील असे आश्वासन त्यांना दिले.आता महापौर हा स्त्री हट्ट पुरवतात का हे पाहावे लागेल..