Kolhapur Accident : कोल्हापुरच्या निपाणी जवळील तवंदी घाटात भीषण अपघात झाला आहे. बेळगावहून कोल्हापूरला निघालेल्या कंटेनरनं तब्बल 7  वाहनांना धडक दिली. या भीषण अपघातात  3 जण जागीच ठार झाले आहेत. तर, 6 जण गंभीर जखमी आहेत. हा अपघात इतका भीषण होता की यात वाहनांचा अक्षरशः चक्काचूर झाला आहे. चालकाचा कंटेनरवरील ताबा सुटल्यानं ही दुर्घटना घडली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जखमी झालेल्या अनेकांची प्रकृती चिंताजनक असून निपाणी मधील रुग्णालयात उपचार केले जात आहेत. कंटेनर वाहनचालकाच्या निष्काळजीपणामुळे हा अपघात झाल्याचं प्राथमिक माहिती घटनास्थळावरून मिळाली आहे. या अपघातात तीन कार, दोन लॉरी, एक कंटेनर आणि अनेक दुचाकी गाड्यांना कंटेनरने जोरदार धडक दिली आहे. या अपघातात दुचाकीस्वार आणि कार मधील दोघे जणांचा जागीच मृत्यू झाला आहे.


पिकअपच्या अपघातात पाच जण जागीच ठार


धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यातील दसवेल फाट्याजवळ भीषण अपघात झालाय.. या अपघातात 5 जणांचा मृत्यू झालाय तर चौघं गंभीर जखमी झालेत.. पिकअपचा चालक दारुच्या नशेत असल्याची प्राथमिक माहिती समोर आलीये.. या अपघातातील जखमींना तातडीने धुळ्यातील हिरे रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं.. वारूळ गावातून कीर्तनाचा कार्यक्रम आटपून ही सर्व मंडळी आपल्या घराकडे परतत होते. त्यादरम्यान भरधाव पिकपने या वाहनाला धडक दिली. त्यामुळे हा भीषण अपघात झाला आहे.