नागपूर : विदर्भातील भूमिधारी शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी...विदर्भातील भूमिधारी शेतक-यांच्या जमीनी कोणतंही शुल्क न आकारता निर्बंधमुक्त करण्याचा महत्वपूर्ण निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे.नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी नागपूरमध्ये ही  माहिती दिली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राज्य सरकारच्या या निर्णयामुळं विदर्भातील जवळपास एक लाखाहून अधिक भूमीधारी शेतक-यांना लाभ होणार आहे.या शेतक-यांना केवळ जमीन कसण्याचा अधिकार होता. 


जमिनीची मालकी राज्य सरकारकडं होती. आता या जमिनीच्या सातबा-यावर या शेतक-यांच्या नावाची नोंद होणार आहे. दरम्यान या योजनेची संपूर्ण महाराष्ट्रात अंमलबजावणी करण्याची मागणी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केलीय.