रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यातील मुर्शी गावात बिबट्यानं घरात घुसून तिघांवर हल्ला केल्याची घटना घडलीय. यामुळे गावात दहशतीचं वातावरण निर्माण झालं असून ग्रामस्थ भयभीत झाले आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुर्शी गावातील तुकाराम शिवगण हे रात्री झोपेत असताना दरवाज्यावरील फटीतून बिबट्या पोटमाळ्यावर चढला आणि त्याने तुकाराम शिवगण यांच्यावर हल्ला केला त्यांनी आरडाओरड केल्यामुळे काय झाले आहे ते बघण्यासाठी शेजारी राहणारे गणपत सुवरे आणि रामचंद्र सुवरे या बापलेकांनी तुकाराम शिगवण यांच्या घरी धाव घेतली. बिथरलेल्या बिबट्याने गणपत सुवरे आणि रामचंद्र सुवरे यांच्यावरही हल्ला चढवला. यात ते गंभीर जखमी झाले. 


अखेर शिताफीने घराचा दरवाजा उघडल्यानं बिबट्या घरातून पसार झाला. असाच प्रकार काही दिवसांपूर्वी संगमेश्वर तालुक्यातील कटवली गावात घडला होता. गेल्या दहा दिवसांत संगमेश्वर तालुक्यात दोन ठिकाणी बिबट्यांनी मानवीवस्तीत घुसून अनेकांना जखमी केलय.