रायगड : रत्नागिरीमध्ये गुरांच्या गोठ्यात शिरलेल्या बिबट्याचा मृत्यू झाला आहे. या बिबट्याला गँगरींग झालं होतं, त्यामुळेच त्याचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मिठगव्हाणे गावातल्या रामा जैतापकर यांच्या गोठ्यात हा बिबट्या घुसला होता. त्याबाबत वन विभागाला कळवण्यात आलं होतं. बिबट्याला गोठ्यातून बाहेर काढण्यासाठी, सुमारे पाच तासांहून अधिक काळ प्रयत्न सुरु होते. अशा प्रकारे अचानक गावात बिबट्या शिरल्यानं ग्रामस्थांमध्ये घबराट पसरली होती.