Breaking News LIVE Updates: महाराष्ट्रासाठी मोठी बातमी, वाढवण बंदराला मंजुरी मिळाली

Wed, 19 Jun 2024-8:32 pm,

Today Breaking News LIVE Updates : महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींबरोबरच दिवसभरातील घडामोडींसहीत देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे सर्व अपडेट्स एकाच ठिकाणी...

Today Breaking News LIVE Updates : महाराष्ट्रातील राजकारणाच्या दृष्टीने आजचा दिवस फार महत्त्वाचा आहे. आज शिवसेना पक्षाचा वर्धापन दिन (Shiv Sena Foundation Day) आहे. 58 वर्षांमध्ये पक्ष फुटीनंतरची ही दुसरी वेळ आहे. उद्धव ठाकरे आणि एकनाश शिंदे हे वेगवेगळे वर्धापन दिन साजरा करणार आहेत. राजकीय घडामोडींबरोबर देशातील तसंच राज्यातील महत्त्वाच्या घडामोडींचे अपेड्टस आपण या लाइव्ह ब्लॉगमधून पाहणार आहोत...

Latest Updates

  • महाराष्ट्रासाठी मोठी बातमी, वाढवण बंदराला मंजुरी मिळाली

    पालघर जिल्ह्यातील ७६ हजार कोटी योजनेच्या वाढवण बंदराला केंद्रीय मंत्रीमंडळाचा हिरवा कंदील

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    मागील 25 वर्षांपासून या बंदराला विरोध 

    25 फेब्रुवारीला मोदींच्या हस्ते भूमिपूजन झालं होतं.

  • मोदी जन्माला येतानाच 400 खुळखुळे घेवून आले; संजय राऊत कडाडले

    देशाच्या राजकारणातील हिरो उद्धव ठाकरे..आजचा दिवस ऐतिहासिक. 19 जून 1966 ne जे महत्व होते तेच आजही आहे. जिंकलेल्यांबरोबच लढले त्यांचाही सत्कार केला. हा शिवरायांचा महाराष्ट्र आहे, तो फडतूस लोकांसमोर झुकणारा नाही. उद्धव ठाकरेंकडे देश आशेने पाहतोय. मोदी जन्माला येतानाच 400 खुळखुळे घेवून आले. सेना संपणार नाही असं संजय राऊत म्हणाले आहेत. 

  • 59 व्या वर्धापन दिनी शिवसेनेचा मुख्यमंत्री असेल- अंबादास दानवे

    59 व्या वर्धापन दिनी शिवसेनेचा मुख्यमंत्री असेल, विरोधी पक्ष नेता अंबादास दानवे यांचं मोठ विधान. त्यांना केवळ 2 वर्ष झाली आणि 58 वा वर्धापन दिन साजरा करत आहेत. त्यांची गद्दार सेना आहे अशी टीकाही त्यांनी केली आहे. 

  • राज ठाकरे नाशिकमध्ये दाखल

    - मनसे पक्ष प्रमुख राज ठाकरेंचं नाशिकमध्ये आगमन
    - राज ठाकरे यांचा कुटुंबासह दोन दिवसाचा दौरा
    - उद्या संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज यांच्या पालखीला राज ठाकरे कुटुंबासह राहणार उपस्थित
    - यानंतर त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगाचे उद्या घेतील दर्शन
    - राज ठाकरे यांच्या दौऱ्याने मनसे पदाधिकाऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण

  • 'बारामतीकर माझी साथ सोडणार नाहीत'

    बारामती लोकसभा निवडणुकीची न्यूयॉर्कमध्ये चर्चा सुरु आहे. बारामतीकर माझी साथ सोडणार नाहीत याचा मला विश्वास होता. यावेळी संघर्षाची निवडणूक होती असं शरद पवार बारातमीमधील सभेत म्हणाले आहेत. 

  • नरसिंगराव उदगिकर यांच्या मुलाची सोशल मीडिया पोस्ट, ट्रोलर्सना दिले उत्तर 

    आलिशान गाड्या घेतल्यानं वंचितचे उमेदवार चांगलेच ट्रोल झालेत.. लातूर लोकसभा मतदारसंघातील वंचित आघाडीचे उमेदवार नरसिंगराव उदगीरकर यांच्या मुलानं सोशल मीडियावर दोन नव्या आलिशान गाड्या खरेदी केल्याचं पोस्ट टाकली.. एक फॉर्च्युनर आणि एक रेंज रोव्हर खरेदी केल्याची पोस्ट उदगीरकरांच्या मुलानं केली.. त्यानंतर नेटक-यांनी उदगीरकरांना चांगलंच ट्रोल केलंय.. काहींनी तर उदगीरकांनी उमेदवारी अर्ज दाखल करताना सादर केलेलं उत्पन्नाचं शपथपत्रच सोशल मीडियावर पोस्ट केलंय.. यात उदगीगरकांनी त्यांचं वार्षिक उत्पन्न 5 लाखाच्या आत असल्याचं नमूद केलंय.. त्यामुळे इतके कमी उत्पन्न असणारी व्यक्ती इतक्या महाग गाड्या कशा घेऊ शकते असा सवाल नेटक-यांनी उपस्थीत केलाय..वंचितच्या उमेदवाराने गाडी घेऊ नये का असा सवाल नरसिंगराव उदगिरकर यांचा मुलगा योगेश उदगीरकर यांनी फेसबूकवर व्हिडीओ पोस्ट करत सवाल केलाय...

  • महाराष्ट्राच्या वाधवन बंदर प्रकल्पाला आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी मिळू शकते. सुमारे 76000 कोटी रुपयांचा हा प्रकल्प आहे.

  • लक्ष्मण हाके यांना पाठिंबा देण्यासाठी बीड जिल्ह्यातील अनेक भागांमधून शेकडो गाड्यांचं कार्यकर्ते लक्ष्मण हाके यांना पाठिंबा देण्यासाठी वडीगोद्रीकडे निघाले आहेत राज्य शासन ओबीसींच्या आंदोलनाकडे दुर्लक्ष करत आहे प्राध्यापक लक्ष्मण हाके हे गेल्या सहा दिवसापासून उपोषणाला बसले आहेत. परंतु अद्याप त्यांच्याकडे मुख्यमंत्री गेलेले नाहीत. सरकारचे हे दुट्टपी वागणे असून हे आम्ही सहन करणार नाही. आता शासनाने ओबीसी आरक्षणाबाबतची भूमिका तात्काळ स्पष्ट न केल्यास यापेक्षाही तीव्र आंदोलन करण्याचा इशारा ओबीसी समाज बांधवांनी दिलाय. 

  • लोणावळ्यात पर्यटकांची प्रचंड, सहा चाकी आणि अवजड वाहतुकीला शहरात बंदी 

    पावसाळ्यात लोणावळ्यात पर्यटकांची प्रचंड गर्दी होते, अशात शहरात मोठी वाहतूक कोंडी होते. ही कोंडी फोडण्यासाठी प्रशासनाने सहा चाकी पुढील अवजड वाहतुकीला शहरात बंदी घातली आहे. सकाळी सहा ते रात्री दहा वाजेपर्यंत हा नियम लागू असेल. या दरम्यान जुन्या पुणे-मुंबई महामार्गाऐवजी या वाहनांनी पुणे-मुंबई एक्सप्रेस-वे वरून प्रवास करावं, असं आवाहन प्रशासनाने केलेलं आहे. आजपासूनचं या नव्या नियमांची अंमलबजावणी करायला सुरुवात होत आहे.

  • मुंबई गोवा महामार्गावरील भोस्ते घाटातल्या संरक्षक भिंतीला तडा

    मुंबई गोवा महामार्गावरील भोस्ते घाटातल्या संरक्षक भिंतीला अपघात ग्रस्त वाहने धडकून कमकुवत झालीय. मुसळधार पावसात भिंत खचण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमधील भोस्ते घाट हा अपघात प्रवण क्षेत्र असून भोस्ते घाटात आतापर्यंत 50 हून अधिक अपघात झाले आहेत. पावसाचा जोर वाढल्यास भेगा आणखी वाढून संरक्षण भिंतीसह महामार्गाचा भाग दरीत कोसळण्याची भीती व्यक्त केली जात आहे. 

  • 'सोशल मीडियात भाजपविरोधात केलेल्या प्रचाराला उत्तर देण्यात राज्यातील नेते कमी पडले'

    दिल्लीतील कालच्या भाजपच्या कोअर कमिटीच्या बैठकीत सोशल मीडियातील प्रचारासंदर्भात देखील चर्चा झाली. सोशल मीडियात भाजपविरोधात केलेल्या प्रचाराला उत्तर देण्यात राज्यातील नेते कमी पडल्याची चर्चा झाल्याची सूत्रांनी माहिती दिलीय. विरोधकांकडून जे मुद्दे सोशल माध्यमांमध्ये मांडले गेलेत, त्याला उत्तर देण्यात भाजप कमी पडल्याची देखील चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. येत्या काळात निवडणुका तोंडावर असताना सोशल मीडियातून देखील विरोधकांना जोरदार प्रत्युत्तर देणार असं ठरलं आहे. 

  • 'सोशल मीडियात भाजपविरोधात केलेल्या प्रचाराला उत्तर देण्यात राज्यातील नेते कमी पडले'

    दिल्लीतील कालच्या भाजपच्या कोअर कमिटीच्या बैठकीत सोशल मीडियातील प्रचारासंदर्भात देखील चर्चा झाली. सोशल मीडियात भाजपविरोधात केलेल्या प्रचाराला उत्तर देण्यात राज्यातील नेते कमी पडल्याची चर्चा झाल्याची सूत्रांनी माहिती दिलीय. विरोधकांकडून जे मुद्दे सोशल माध्यमांमध्ये मांडले गेलेत, त्याला उत्तर देण्यात भाजप कमी पडल्याची देखील चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. येत्या काळात निवडणुका तोंडावर असताना सोशल मीडियातून देखील विरोधकांना जोरदार प्रत्युत्तर देणार असं ठरलं आहे. 

  • 'हमारे बारह' चित्रपटाच्या प्रदर्शनाला मुंबई उच्च न्यायालयाची परवानगी

    वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या 'हमारे बारह' चित्रपटाला अखेर मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठानं हिरवा कंदील दाखवला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर, उच्च न्यायालयाच्या दोन न्यायाधीशांच्या खंडपीठानं चित्रपट पाहिला. त्यानंतर मंगळवारी सुमारे चार तास सुनावणी झाल्यानंतर या चित्रपटाच्या प्रदर्शनाला परवानगी देण्यात आली. याबाबत सविस्तर निकाल बुधवारी देण्यात येणार आहे. न्यायमूर्ती बी.पी. कुलाबावाला आणि न्यायमूर्ती फिरोझ पुनीवाला यांच्या खंडपीठानं दोन्ही पक्षांना सामंजस्य करार करण्याचं निर्देश दिले आहेत. त्यामुळे येत्या शुक्रवारी हा चित्रपट प्रदर्शित होण्यामधील अडथळे संपुष्टात आले.

  • 'मागण्या पूर्ण होणार नाही तोपर्यंत खाणीचे काम बंद'

    चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती शहरालगतच्या कर्नाटक -एमटा कोळसा खाण व्यवस्थापकाला नवनिर्वाचित खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या उपस्थितीत आंदोलना करण्यात आले. स्थानिकांच्या 16 मागण्यांसाठी काँग्रेस कार्यकर्त्यांनी आंदोलनाची हाक दिलीय. आंदोलनस्थळी आज खासदार प्रतिभा धानोरकर यांनी भेट दिली. यावेळी आंदोलक आणि व्यवस्थापक यांच्यात मागण्याच्या पुर्ततेवरून शाब्दिक चकमक आणि मारहाण झाली. मारहाणीनंतर पोलिसांनी जमावाला पांगविले. दरम्यान काँग्रेस कार्यकर्त्यांनी मागण्या पूर्ण होईपर्यंत खाणीचे काम बंद पाडले आहेत. 

  •  NDA चे अनेक खासदार संपर्कात, राहुल गांधी मोठा दावा

    काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा भाजप आणि नरेंद्र मोदींवर हल्लाबोल केला. गांधी म्हणाले की 2024 च्या सार्वत्रिक निवडणुकीनंतर लोकसभेतील संख्या 'खूप कमकुवत' असेल आणि 'एक छोटीशी चूक देखील एनडीए सरकार पाडू शकते'. फायनान्शिअल टाईम्सशी बोलताना राहुल म्हणाले, 'मुळात एका मित्राला दुसऱ्या बाजूला वळवावे लागते.' कोणाचेही नाव न घेता राहुल यांनी दावा केला की एनडीएचे लोक 'आमच्या संपर्कात आहेत' आणि मोदी छावणीत 'खूप असंतोष' आहे.

     

  • राज्यात 3 हजार 749 तलाठी नियुक्तीच्या प्रतीक्षेत 

    तलाठ्यांची निवड करुन सरकारला नियुक्तीचा विसर पडला आहे का? असा प्रश्न उपस्थितीत होतोय. राज्यात 3 हजार 749 तलाठींची निवड झाली आहे. पण अद्याप या तलाठ्यांची निवड करण्यात आलेले नाही. 

  • ...तर राज्य सरकार कसं हातात येत नाही मी बघतो - शरद पवार 

    ;'आज केंद्र आणि राज्य सरकार आमच्या हातात नाही. उद्या निवडणुका येतील कालच्या निवडणुकीत झालं तसं काम झालं तर राज्य सरकार कसं हातात येत नाही मी बघतो,' असं शरद पवारांनी बारामतीच्या नीरावागजमध्ये जाहीर सभेत वक्तव्य केलं. 'राज्य सरकार हातात आलं तर ही दुखणी दुरुस्त करायला वेळ लागणार नाही', असंही ते यावेळी म्हणाले. 'नेत्यांनी काही केलं नाही पण मी तुमच्या पाठीशी उभा राहणार' असं आवाहन शरद पवारांनी केलंय.

  • अजित पवारांच्या आमदाराचा ठाकरेंच्या उमेदवाराला पाठिंबा; 'त्या' रिकाम्या चौकटीने 'वेगळ्या निर्णयाची' चर्चा

    लोकसभा निवडणुकीमध्ये अजित पवार गटाला समाधानकारक कामगिरी करता आलेली नाही. लोकसभेच्या निकालानंतरपासून अजित पवार गटामध्ये अस्वस्थता असल्याचा दावा केला जात आहे. विरोधकांनी तर अजित पवार गटातील काही आमदार बाहेर पडतील आणि पुन्हा शरद पवारांकडे येतील अशी शक्यता व्यक्त केलेली आहे. अशातच मागील काही दिवसांपासून राष्ट्रवादीच्या अजित पवार गटामध्ये छगन भुजबळ नाराज असल्याची चर्चा आहे. मात्र आता आणखीन एक आमदाराने स्वत:च्या वाढदिवासानिमित्त घेतलेल्या एका निर्णयामुळे आणि या आमदाराच्या वाढदिवसाच्या जाहिरातींमुळे हा आमदार अजित पवार गट सोडणार का याची जोरदार चर्चा सुरु झाली आहे. येथे वाचा सविस्तर वृत्त...

  • जळगावात पाणीपुरी खाल्ल्याने 80 जणांना विषबाधा 

    जळगावच्या चोपडा तालुक्यातील कमळगावमधील आठवडे बाजारात पाणीपुरी खाल्ल्याने सुमारे 80 जणांना विषबाधा झालीय. विषबाधा झालेल्या रुग्णांमध्ये चोपडा तालुक्यातील पिंप्री, चांदसणी कमळगावमधील ग्रामस्थांचा समावेश आहे. पाणीपुरी खाल्यानंतर सकाळी उलट्या, जुलाब, पोट दुखण्याचा त्रास पीडितांना झाला. 70 पैकी 30 रुग्ण चोपडामधील उपजिल्हा रुग्णालयात तसंच इतर रुग्ण खासगी आणि जळगाव जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले. तर 10 रुग्णांवर चोपड्याच्या अडावदमध्ये उपचार सुरू आहेत. बाधित रुग्णामध्ये लहान मुलांचाही समावेश आहे. 

  • राज्यात पोलीस भरतीला सुरूवात 

    राज्यात आज सर्वत्र पोलीस भरती सुरू झाली आहे अहमदनगर येथे सकाळी पाच वाजेपासून पोलीस भरती प्रक्रियेला सुरुवात झाली असून शहरातील पोलीस परेड मैदानावर भरतीसाठी आलेल्या उमेदवारांची पात्रता चाचणीला सुरुवात झाली आहे अहमदनगर पोलीस दलासाठी 25 पदे पोलीस शिपाई बँड्समन पदे तर 39 पदेचालक पोलीस शिपाई पदे आहेत एकूण 64 जागांसाठी होत असलेल्या भरती प्रक्रियेला 5 हजार 856 उमेदवारां चे अर्ज पात्र ठरले आहेत पहिल्या दिवशी चाचणी प्रक्रियेत शारीरिक पात्रता आणि मैदानी चाचणी होणार असून त्यानंतर कागदपत्राची छाननी होईल यानंतर पात्र झालेल्या उमेदवारांना लेखी परीक्षा ही द्यावी लागणार आहे.

  • लक्ष्मण हाकेंना पाठिंबा देण्यासाठी ओबीसी व्हिजिएनटी बहुजन परिषदेचे आंदोनल

    ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या सुरू असलेल्या उपोषणाला पाठिंबा म्हणून सांगलीतल्या ओबीसी व्हिजिएनटी बहुजन परिषदेकडून आंदोलन करण्यातआलंय. कडेगाव या ठिकाणी ओबीसी समाजाने सरकारचे लक्ष वेधण्यासाठी निदर्शने करण्यात आले. त्याच बरोबर लक्ष्मण हाके यांच्या मागण्यांबाबत सरकारकडून दखल घेण्यात यावी. अशा मागणीचे निवेदन देखील कडेगाव तहसीलदारांना देण्यात आले आहे. तसंच मराठा समाजाला देण्यात येणाऱ्या आरक्षण मध्ये सगे-सोयरे बाबतचा कायदा करू,नये अन्यथा आगामी विधानसभा निवडणुकीत ओबीसी समाज सरकारच्या सत्तेवर नांगर फिरवेल,असा इशारा ओबीसी व्हिजिएनटी बहुजन परिषदेचे प्रदेश सरचिटणीस संग्राम माने यांनी दिला आहे

  • शरद पवार सलग दुसऱ्या दिवशी बारामती तालुक्याच्या दौऱ्यावर

    शरद पवार आज सकाळी नऊ वाजल्यापासून सांगवी, खांडज ,निरावागज, डोरलेवाडी ,काटेवाडी, पिंपळे गावातील दुष्काळी दौरा करून नागरिकांशी संवाद साधणार आहेत. शरद पवार यांच्या सोबत खासदार सुप्रिया सुळे ही बारामती दौऱ्यावर आहेत. 

     

  • ठाकरेंच्या शिवसेनेच आज शक्तीप्रदर्शन 

    ठाकरेंच्या शिवसेनेचा वर्धापन दिन षण्मुखानंद सभागृहात साजरा करण्यात येणाराय. वर्धापन दिनानिमित्त ठाकरेंच्या शिवसेनेचही आज शक्तीप्रदर्शन असणार आहे. लोकसभा निवडणुकीनंतर हा शिवसेनेच हे पहिलच शक्तीप्रदर्शन आहे. वर्धापन दिनाला स्वतः पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, ठाकरे कुटुंबियांसोबत ठाकरेंचे सर्व आमदार खासदार जिल्हाप्रमुख संपर्कप्रमुख आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित असणार आहे. 

  • शिंदेंच्या शिवसेनेचा वर्धापन दिन सोहळा

    आज वरळी डोम इथे एकनाथ शिंदे गटाच मोठं शक्तीप्रदर्शन असणार आहे. कारण शिंदेंची शिवसेना वरळीमध्ये शिवसेना पक्षाचा वर्धापन दिन साजरा करणाराय. संध्याकाळी 5 वाजता हा सोहळा असणार आहे. 

     

ZEENEWS TRENDING STORIES

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by Tapping this link