Maharashtra Breaking News LIVE : घराणेशाही पक्षांची स्वत:ची विचारधारणा नसते - मुख्यमंत्री

Sat, 28 Sep 2024-2:27 pm,

Maharashtra Breaking News LIVE : दिवसभरात अनेक महत्त्वाच्या घडामोडींवर सर्वांचं लक्ष राहणार असून, विधानसभा निवडणुकीच्या धर्तीवर कोणते राजकीय बदल होतात हे पाहणंसुद्धा औत्सुक्याचं ठरणार आहे.

Latest Updates

  • Maharashtra Breaking News LIVE : अजित पवारांना सोबत घेणं फायदेशीर राहिलं नाही- फडणवीस

    मुंबईत झी मीडियाचं 'एक भारत, श्रेष्ठ भारत'... हे कॉन्क्लेव्ह पार पडतंय. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवारांबद्दल मोठं विधान केलंय. अजित पवारांना सोबत घेणे हे नुकसानदायक राहिलं नाही. पण अपेक्षेप्रमाणे त्यांच्याकडून कुठलाही फायदाही झाला नाही. त्यामागे कारणही आहे, एकनाथ शिंदे आणि त्यांचा पक्ष जेव्हा आमच्या सोबत आला ती आमची नैसर्गिक युती आहे. त्यांच्यासोबत आमचं भावनिक नातं होतं. त्यामुळे ती युती फायदेशीर राहिली. जेव्हा अजित पवार आमच्यासोबत आले तेव्हा आमचं भावनिक नातं नव्हतं. ही युती एक राजकीय खेळी होती. त्यामुळे त्यांच्या पक्षातील लोकांचं मत आमच्याकडे वळवणं कठीण होतं. पण लोकसभामध्ये जेवढा फायदा झाला त्यापेक्षा जास्त फायदा विधानसभेत होणार, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. 

     

  • Maharashtra Breaking News LIVE : नितेश राणेंवर आम्ही 2 वेळा एफआयआर केली - फडणवीस 

    मुंबईत झी मीडियाचं 'एक भारत, श्रेष्ठ भारत'... हे कॉन्क्लेव्ह पार पडतंय. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मोठं विधान केलंय. शिवाय नितेश राणे हे कट्टर हिंदुत्त्ववादी असलेले आमजचे आमदार आहे. आम्ही काँग्रेस थोडी आहोत, आम्ही हिंदुत्त्वादी आहेत. हिंदू समाजात जनजागृतीचं काम नितेश राणे करतात. नितेश राणेचे काही वक्तव्यांचं समर्थन नाही होऊ शकतं. नितेश राणेंवर आम्ही 2 वेळा एफआयआर केली. आम्ही कायद्याने काम करतो. आम्ही त्यांना हिंदुत्वाबद्दल बोलण्यापासून रोखू शकणार नाही, असंही ते यावेळी म्हणालेत. 

     

  • Maharashtra Breaking News LIVE : हर्षवर्धन पाटलांचं ठरलं! पितृपंधरवडा संपल्यानंतर निर्णय घेणार

    हर्षवर्धन पाटलांचं ठरलं. मात्र ते पितृपंधरवडा संपल्यानंतर निर्णय घेणार असल्याचं त्यांनी सांगितलंय. इतकंच नाही तर दहा वर्षांत सविंधानिक पद नाही तरीही आपण जनतेच्या आग्रहाखातर काँगेस, भाजपात जाण्याचा निर्णय घेतला, आणि आताही जे काही जनतेच्या मनात असेल तोच निर्णय घेऊ असंही ते म्हणाले. इंदापुरातील सभेदरम्यान कार्यकर्त्यांनी तुतारी हाती घेण्याची घोषणाबाजी केली. यावर कार्यकर्त्यांता आग्रह डावलता येणार नाही असं म्हणत त्यांनी तुतारी हाती घेणार असल्याचे संकेत दिले. 

     

  • Maharashtra Breaking News LIVE : विधानसभा निवडणुकीपूर्वी अजित पवारांना नवीन चिन्ह ?

    आमदार अपात्रता आणि राष्ट्रवादी पक्षाचं नाव, चिन्ह वाद प्रकरण सर्वोच्च न्यायालयात 1 ऑक्टोबरला सुनावणी होणार आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी अजित पवारांना नवीन चिन्ह मिळण्याची शक्यता आहे. सुप्रीम कोर्टात शरद पवार गटाच्या वतीने याचिका दाखल करण्यात आली होती. घड्याळ ऐवजी दुसर चिन्ह देण्याची शरद पवार गटाची मागणी केली. तर राहुल नार्वेकर यांच्या आमदार अपात्रतेप्रकरणी निर्णयाला शरद पवार आणि उद्धव ठाकरेंच्या वतीने सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आलंय. सुप्रीम कोर्ट काय निर्देश देणार, याकडे दोन्ही गटाचे लक्ष लागलंय. 

  • Maharashtra Breaking News LIVE : 'निवडणुकीपूर्वी रश्मी शुक्लांना पदावरून हटवा'

    निवडणुकीपूर्वी रश्मी शुक्लांना पदावरुन हटवण्याची मागणी काँग्रेसनं केलीये. विधानसभेच्या निवडणुका पारदर्शक आणि निष्पक्षपातीपणे पार पडण्यासाठी रश्मी शुक्ला यांच्यासह वादग्रस्त आणि सत्ताधारी पक्षाला मदत करणा-या अधिकाऱ्यांना हटवा अशी मागणी काँग्रेसनं निवडणूक आयोगाकडे केलीये.

     

  • Maharashtra Breaking News LIVE : अजित पवार पक्षाचा अंतर्गत वाद चव्हाट्यावर 

    एक मोठी राजकीय बातमी सोलापुरातून...सोलापुरात अजित पवार पक्षाचा अंतर्गत वाद चव्हाट्यावर आलाय. राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते उमेश पाटलांनी राजीनामा देण्याची तयारी दर्शवलीय. मात्र, पक्षातील वरिष्ठांकडून काही दिवस थांबण्याच्या सल्ला देण्यात आल्याची माहिती उमेश पाटलांनी दिलीय. राजन पाटलांची महाराष्ट्र राज्य सहकार परिषदेवर नियुक्ती करण्यात आलीय. तसेच त्यांना राज्यमंत्रिपदाचा दर्जा देण्यात आल्यानं उमेश पाटील आक्रमक झालेत. त्यांनी थेट राजीनामा देण्याची तयार दर्शवलीय. मोहळमधून पराभव झाल्यानंतर पक्षाचे डोळे उघडतील, अशी प्रतिक्रियाही उमेश पाटलांनी दिलीय.

  • Maharashtra Breaking News LIVE : नाशिकमध्ये आज भव्य स्मारकाचं उदघाटन

    राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ  थेट रुग्णालयातून विशेष विमानाने नाशिकमध्ये  दाखल होणारेत.  भुजबळ पुणे दौऱ्यावर असतांना  घशाचा संसर्ग झाल्यानं त्यांना विशेष विमानानं मुंबईत आणून बॉम्बे रुग्णालयात उपचारासाठी  दाखल करण्यात आलं. भुजबळ यांची तब्येत स्थिर असली तरी डॉक्टरांनी त्यांना पूर्ण विश्रांतीचा सल्ला दिलाय..मात्र तरीही ते नाशिकला जाणार आहेत. नाशिकचे प्रवेशद्वार असलेल्या मुंबई नाका इथं भुजबळ यांच्या संकल्पनेतुन महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचं भव्य स्मारक उभारण्यात आलंय, त्याचं उदघाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत होणारेय, या कार्यक्रमासाठी भुजबळ हे रुग्णलयात दाखल असतांनाही येणार आहेत, ते रुग्णालयातून थेट मुंबई विमानतळावर येतील, तेथून विशेष विमानाने नाशिकला येतील आणि कार्यक्रम संपताच पुन्हा मुंबईला जाऊन रुग्णालयात दाखल होतील, डॉक्टरांनी पूर्ण विश्रांतीचा सल्ला दिलेला असतानाही भुजबळ नाशिकमध्ये जाणार आहेत.

  • Maharashtra Breaking News LIVE : . सिनेटमध्ये विजय मिळवला याचा अर्थ विधानसभा जिंकली...

    सिनेटच्या निकालानंतर राजकीय प्रतिक्रिया उमटू लागल्यात. मंत्री उदय सामंतांनी आदित्य ठाकरेंवर निशाणा साधलाय. सिनेटमध्ये विजय मिळवला याचा अर्थ विधानसभा जिंकली असा होत नाही आणि तशा अविर्भावातही राहू नये, असा चिमटा उदय सामंतांनी आदित्य ठाकरेंना काढलाय.

     

  • Maharashtra Breaking News LIVE : मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आज नाशिक दौऱ्यावर

    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्री आज नाशिक दौ-यावर आहेत.. नाशिकमध्ये विविध विकास कामांचं भूमिपूजन आणि उद्घाटन होणार आहे.. दुपारी दोन ते पाच वाजेपर्यंत तीन तास मुख्यमंत्री नाशिकमध्ये असणार आहेत. त्यांच्या हस्ते मराठा धनगर विद्यार्थ्यांसाठी वस्तीगृह, स्मृती उद्यानाचे लोकार्पण , महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्याचा अनावरण तसंच रस्त्यांच्या कामांचं भूमिपूजन होणार आहे. त्यांच्यासोबत उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस उपस्थित असणार आहेत.. 

     

  • Maharashtra Breaking News LIVE : महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांना धोका - रोहित पवार

    महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांना धोका आहे. त्यांना केंद्र सरकारनं झेड प्लस सुरक्षा द्या, असं उपरोधिक विधान आमदार रोहित पवारांनी केलंय. एक महिला थेट फडणवीसांच्या कार्यालयाबाहेर राडा घालते. गृहमंत्र्यांची ही अवस्था असेल तर सर्वसामान्यांची काय परिस्थिती असेल? असा टोलाही रोहित पवारांनी लगावलाय. 

     

  • Maharashtra Breaking News LIVE : 'राजीव गांधींच्या सरकारमध्ये मला मंत्रिपदाची ऑफर'

    प्रकाश आंबेडकरांनी चक्क मंत्रिपद नाकारलं होतं.. याचा गौप्यस्फोट खुद्द प्रकाश आंबेडकरांनीच टू द पॉईंट मुलाखतीमध्ये केलाय.. 1984 मध्ये तत्कालीन राजीव गांधी सरकारमध्ये प्रकाश आंबेडकरांना मंत्रिपदाची ऑफर होती.. मात्र त्याचवेळी प्रकाश आंबेडकरांनी व्ही.पी.सिंग यांना शब्द दिला होता. त्यामुळे प्रकाश आंबेडकरांनी राजीव गांधींची ऑफर नाकारली होती. त्यानंतर व्ही. पी. सिंग यांच्या मंत्रिमंडळातही मंत्रिपदाची ऑफर होती मात्र तीही नाकारली असा गौप्यस्फोट आंबेडकरांनी या मुलाखतीत केलाय..

     

  • Maharashtra Breaking News LIVE : 'उद्धव ठाकरेंसाठी दरवाजे बंद केलेले नाहीत'

    उद्धव ठाकरेंसाठी आम्ही दरवाजे बंद केलेले नाहीत. उद्धव ठाकरे आमच्यासोबत आले तर चर्चा करु असं विधान प्रकाश आंबेडकरांनी केलंय. टू द पॉईंट मुलाखतीत प्रकाश आंबेडकरांनी उद्धव ठाकरेंना ही ऑफर दिलीय. मात्र आम्ही कोणाकडे जाणार नाही असंही प्रकाश आंबेडकरांनी यावेळी स्पष्ट केलंय. 

  • Maharashtra Breaking News LIVE : भुजबळ-मुंडेंनी ओबीसींचं संघटन करावं

    छगन भुजबळ आणि धनंजय मुंडे जर आमच्यासोबत आले तर महाराष्ट्रात आम्ही एकहाती सत्ता आणू असं मोठं विधान प्रकाश आंबेडकरांनी केलंय.. झी २४ तासच्या टू द पॉईंट मुलाखतीत प्रकाश आंबेडकरांनी हे विधान केलंय.. छगन भुजबळ आणि धनंजय मुंडेंनी ओबीसींचं संघटन करावं अशी अपेक्षाही प्रकाश आंबेडकरांनी बोलून दाखवलीय. आता छगन भुजबळ आणि धनंजय मुंडे प्रकाश आंबेडकरांची ही ऑफर स्वीकारणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलंय..

     

  • Maharashtra Breaking News LIVE : जरांगेंसोबत आघाडी करु शकत नाही-आंबेडकर

    मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत आघाडी करु शकत नाही असं वंचित बहूजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांनी स्पष्टच सांगितलंय.. टू द पॉईंट मुलाखतीत प्रकाश आंबेडकरांनी हे मोठं विधान केलंय.. आरक्षणवादी असलो तरी जरांगेंच्या मागणीला आमचा पाठिंबा नाही असं आंबेडकरांनी म्हटलंय. तसंच जरांगेही आमच्यासोबत येऊ शकत नाही कारण त्यांना तडजोड करावी लागेल असंही आंबेडकरांनी स्पष्ट केलंय..

     

  • Maharashtra Breaking News LIVE : 'जरांगेंनी निवडणूक लढवली नाही तर...'

    मनोज जरांगे पाटील यांनी निवडणूक लढवली पाहिजे.. जरांगेंनी निवडणूक लढवली नाही तर हे आंदोलन शरद पवारांनीच चालवलं आहे असा निष्कर्ष लोक काढतील असा मोठा दावा प्रकाश आंबेडकरांनी केलाय. टू द पॉईंट मुलाखतीत प्रकाश आंबेडकरांनी हे मोठं विधान केलंय.. 

     

  • Maharashtra Breaking News LIVE : 'वंचितला सोबत न घेतल्यानं काँग्रेसचा पंतप्रधान नाही'

    काँग्रेसने वंचितला सोबत घेतलं असतं तर आज राहुल गांधी पंतप्रधान असले असते असा मोठा दावा प्रकाश आंबेडकरांनी केलाय. झी २४ तासच्या टू द पॉईंट मुलाखतीत आंबेडकरांनी हा दावा केलाय.. काँग्रेसने वंचितला सोबत घेतलं असतं तर भाजपला रोखता आलं असतं.. वंचित आणि काँग्रेसने मिळून भाजपला 220 जागांच्या वर जाऊ दिलं नसतं असंही आंबेडकर म्हणालते. तसंच जर भाजपच्या 20 जागा कमी झाल्या असत्या तर मोदी पंतप्रधान झाले नसते तर राहुल गांधी पंतप्रधान झाले असते असा दावाही प्रकाश आंबेडकरांनी केलाय.. वंचितला न घेतल्याने काँग्रेसने पंतप्रधानपदाची संधी गमावली असं आंबेडकर म्हणालेत..

     

ZEENEWS TRENDING STORIES

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by Tapping this link