विकास भोसले, झी मीडिया, सातारा : महाबळेश्वर शहराची जलवाहिनी असलेल्या 'वेण्णा लेक'ची ख्याती देशभर पसरली आहे. महाबळेश्वर आणि पाचगणी शहराला पाणी पुरवठा करण्यासाठी वेण्णा लेक सन २००० साली बांधण्धयात आले.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तसंच लाखो पर्यटकांचे नौका विहार करणारे महाबळेश्वर येथील वेण्णा लेक सन २००० साली बांधण्धयात आले मातीमध्ये हे बांधलेले धरण असुन ०.६१२ टिएमसी पाणीसाठा होतो सध्या धरणाला मोठी गळती लागली असुन दररोज ५ लाख लिटर पाणी वाया जात आहे या वेण्णा लेक मध्ये नगरपालिकेचा लाखो रुपयेचा महसुल मिळतो


वेण्णा धरणाची गळती जलसंपदा विभागाने लवकर थांबवली नाही तर. महाबळेश्वर शेजारील १२ गावांना धोका निर्माण होउ शकतो. दररोज ५ लाख लीटर पाणी वायाय जात असल्यानं वेण्णा लेक मध्ये पाणीच शिल्लक राहणार नाही अशी भिती स्थानिकानी व्यक्त केली आहे. 


आता १५ लाख पर्यटकांचे खास आकर्षण असलेले वेण्णा लेक वाचविण्यासाठी जलसंपदा विभाग काय पायल उचलते हे पहावे लागेल.