रत्नागिरी : महाराष्ट्र बंदचे कोकणातही पडसाद उमटले आहेत. रत्नागिरी जिल्ह्यात शिवसेना आमदार बंदला पाठिंबा देण्यासाठी रस्त्यावर उतरले आहेत. रत्नागिरी जिल्ह्यातल्या राजापूर आणि लांजामधली बाजारपेठ शिवसैनिकांनी बंद पाडलीय. त्यासाठी राजापूरचे आमदार राजन साळवी हे आपल्या कार्यकर्त्यांसह रस्त्यावर उतरले आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 शिवसैनिकांबरोबर रस्त्यावर उतरून त्यांनी बाजारपेठ बंद पाडली.  तर राज्यात सुरु असलेल्या शेतकरी संपाला रायगडमध्ये शेतकरी कामगार पक्षाने पाठिंबा दिला.  


रायगड जिल्ह्यात शेकापतर्फे बंदचे आवाहन करण्यात आले होते. त्यानुसार अलिबागमधील व्यापाऱ्यांनीही आपली दुकाने बंद ठेवून संपाला पाठिंबा दिला. शेकापतर्फे अलिबाग तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.  माजी मंत्री मीनाक्षी पाटील यांनी या मोर्चाचे नेतृत्व केले.