नाशिक : मालेगावात महिला शेतमजुरांना घेऊन जाणारा एक ट्रॅक्टर तलावात बुडून दुर्घटना घडलीय. या घटनेत पाच शेतमजुर महिलांवर काळानं घाला घातलाय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या घटनेमुळे मालेगाव तालुक्यातील अजंग गाववर शोककळा पसरलीय. मंगळवारी सायंकाळच्या सुमारास 24 महिलांना घेऊन जाणारा एक ट्रॅक्टर तलावात बुडालाय. 


मालेगाव तालुक्यातील अजंग शिवारात ढवळी विहीर भागात ही घटना घडलीय. चालकाचं ट्रॅक्टरवरचं नियंत्रण सुटल्यानं ही दुर्दैवी घटना घडलीय.


या घटनेत पाच मजूर महिलांचा तलावात बुडून मृत्यू झालाय तर 10 पेक्षा जास्त महिला गंभीर जखमी झाल्यात. मृतांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय.  


घटनास्थळी मदत यंत्रणा दाखल झाली असली तरी अंधार पडल्यामुळे मदतकार्यात अडचण येतेय.