जालना : विधानपरिषदेसाठी आज जालन्यात मतदान होतं आहे. शिवसेनेचे औरंगाबाद जिल्ह्याचे जिल्हाप्रमुख अंबादास दानवे आणि जालना जिल्ह्यातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाबुराव कुलकर्णी यांच्यात या निवडणुकीसाठी थेट लढत पाहायला मिळणार आहे. मात्र आता या निवडणुकीत एमआयएम शिवसेनेच्या मदतीला धावून आल्याचं चित्र आहे. एमआयएमचे नगरसेवक शिवसेनेला मदत करणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एमआयएम आणि शिवसेनेच्या नेत्यांची काल रात्री गुप्त बैठक झाली त्यात ही खलबतं झाल्याची माहिती आहे. त्यामुळे अंबादास दानवेंचा विजय सुकर मानला जातोय. या निवडणुकीत ६५६ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. यापैकी ३८४ मतदार हे औरंगाबाद जिल्ह्यातील असून २७२ मतदार आहेत. या निवडणुकीत महापालिका, नगरपालिका आणि जिल्हा परिषदेचे सदस्य मतदार असतात.


या मतदारसंघासाठी १९ ऑगस्टला मतदान होणार असून २२ ऑगस्टला मतमोजणी होणार आहे. तर मतदारसंघात २६ ऑगस्टपर्यंत आचारसंहिता लागू राहणार आहे.