Mumbai Goa Highway Traffic Jam : मुंबई-गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी झाली आहे. रायगड-मुंबई गोवा महामार्ग (Mumbai Goa Highway) अलिबाग बाय पासवर ही वाहतूक कोंडी पाहायला मिळत आहे. वडखळ इथं अलिबागकडे जाणाऱ्या मार्गावर वाहतुकीची कोंडी झालेली असून अलिबाग लेनवर वाहनांच्या लांबच लांब रांगा दिसत आहेत. सलग दुसऱ्या दिवशी मुंबई गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी पाहायला मिळत आहे. कोकणात विशेषतः अलिबागकडे जाणाऱ्या पर्यटकांच्या वाहनांची रिघ लागलेली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ख्रिसमस निमित्ताने सुट्टी असल्याने तर काही जण गोव्याकडे थर्टीफस्ट आणि नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी निघाले आहेत. त्यामुळे Mumbai Goa Highway मार्गावर वाहनांची मोठी गर्दी दिसून येत आहे. दोन दिवस सुट्टी असल्याने कोकणात आणि गोव्यात फिरण्यासाठी जाणाऱ्यांच्या संख्येत वाढ झालेली दिसून येत आहे. त्यामुळे वाहतूक कोंडी पाहायला मिळत आहे. त्यातच मुंबई - गोवा महामार्गाच काम सुरु आहे तर काही ठिकाणी रखडलेले पाहायला मिळत आहे. त्यामुळे वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे.


दरम्यान, पुणे - मुंबई महामार्गावर वाहतूक कोंडी (Mumbai Goa Highway Traffic Jam) झाली होती. ती दुपारी सुटली. कालही मुंबई-गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी दिसून येत होती. माणगाव बसस्थानक ते खरवली फाट्यापर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. कोकणात जाणाऱ्या मार्गावर वाहतुकीची कोंडी दिसत होती. कोकणात जाणाऱ्या पर्यटकांच्या वाहनांची संख्या वाढली आहे. त्यामुळे वाहतूक कोंडीची समस्या निर्माण झाल्याचे सांगण्यात येत आहे.


ख्रिसमसची (Christmas) सुट्टी आणि विकेंडमुळे मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर काल मोठी वाहतूक कोंडी झाली पाहायला मिळाली होती. ( Traffic Jam on Mumbai-Pune Expressway) पुण्याकडे जाणाऱ्या लेनवर खालापूर टोलजवळ वाहनांच्या रांगा दिसून लागल्या होत्या. त्यामुळे पुण्याला जात असाल किंवा मुंबईला येणाऱ्यांचे प्रचंड हाल होत होते. (Traffic block on Mumbai Pune Expressway) आज या मार्गावर वाहतूक सुरळीत असली तरी मुंबई - गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी झाल्याने अनेकांना त्रास सहन करावा लागला.


 विकेंड आला की मुंबई गोवा आणि मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर सकाळपासून वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत असल्याचे दिसून आले आहे. आता तर रविवारी ख्रिसमस सुट्टी असल्याने अनेक जण फिरण्यासाठी बाहेर पडले आहेत. तसेच घरी जाणाऱ्यांची संख्याही जास्त असल्याने महामार्गावर जास्तीचे वाहने दिसून येत आहेत. त्यामुळे वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे.