अलिबाग : रायगडमध्ये मुंबई गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी झाली. ५ दिवसांचे गणपती आणि गौरीचा उत्सव गावात साजरा करुन, कोकणातले चाकरमानी मुंबईला परतत आहेत. त्यामुळे रायगड जिल्ह्यातल्या माणगाव इथे वाहतुकीची कोंडी झाली. 


माणगावला मुंबईकडे येणाऱ्या मार्गावर ४ किलोमीटरपर्यंत वाहनांच्या लांब रांगा लागल्या. परिणामी प्रवाशांचा चांगलाच खोळंबा झाला. ही वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी ढालघर फाटा इथून वाहतूक निजामपूर पालीमार्गे वळवण्यात आली.