पालघर : पालघरमध्ये झालेल्या ईव्हीएमच्या गडबडीप्रकरणी तसंच पालघरमध्ये एका रात्रीत मतदानाचा टक्का वाढल्याप्रकरणी आवाज उठवणार असल्याची प्रतिक्रिया शिवसेनेनं दिलीय. पालघर निवडणूकीत मतमोजणीतही घोळ झाल्याचा आरोप करण्यात येतोय. शिवसेना यासंदर्भात निवडणुक आयोगाकडे तक्रार दाखल करणार असल्याचे शिवसेना नेते संजय राऊत यांनी सांगितले आहे. मतमोजणीत घोळ झाल्याचा आरोप शिवसनेने केलाय. 20 ते 24 फे-यांदरम्यान मतांमध्ये तफावत असल्याचा आरोपही त्यांनी केला.