कुडाळ : नारायण राणेंनी काँग्रेस आणि प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाणांवर जोरदार टीका करत बंडाचं रणशिंग फुंकलं आहे. २१ सप्टेंबरला राजकीय दिशा ठरवणार असल्याची घोषणा करत काँग्रेसमधून बाहेर पडण्याचे संकेत, यावेळी नारायण राणे यांनी दिले. तसंच ग्राम पंचायतच्या निवडणुकीत समर्थ पॅनलच्या नावाखाली स्वंतत्रपणे लढणार असल्यातीही घोषणा केली आहे. 


नारायण राणे यांची काही दिवसांपूर्वी भाजपमध्ये जाण्याची चर्चा होती, यावर नारायण राणे यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नव्हती, मात्र यानंतर काँग्रेसने आता सिंधुदूर्ग जिल्ह्याची कार्यकारीणी बदलली, यात राणेंना कोणतीही विचारणा न केल्याने चर्चेला उधाण आलं आहे. यानंतर नारायण राणे यांनी अशोक चव्हाण यांच्यावर टीकास्त्र उगारलं आहे.