Navi Mumbai Crime News: नवी मुंबई येथे एक धक्कादायक घटना घडली आहे. वडिलांनी आणि भावानेच मुलीच्या प्रियकराची हत्या केली आहे. या प्रकरणी मुंबई पोलिसांनी 24 वर्षीय भावाला आणि वडिलांना (वय ४५)  अटक केली आहे. नवी मुंबई टाउनशिप येथे ही घटना घडली आहे. रविवारी दुपारी ही घटना उघडकीस आली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी दुपारी तरुणीने तिच्या प्रियकराला पनवेल येथील देवाचा पाडा येथे घरी बोलवले होते. त्याचवेळी तरुणीचा भाऊदेखील घरी आला होता. सुरुवातीला त्याचे दरवाजा वाजवला मात्र तरुणीने काहीच प्रतिसाद दिला नाही. त्यानंतर त्याने जबरदस्ती दरवाजा उघडून आत गेला तेव्हा त्याच्या लक्षात आले की बहिण आणि तिचा प्रियकर आतमध्ये आहेत. तेव्हा आरोपीने त्यांच्या वडिलांना फोन केला. 


बहिणीसोबत प्रियकराला पाहून तिच्या भावाचा राग अनावर झाला त्यानंतर भाऊ आण वडिलांनी तिच्या प्रियकराला मारहाण करण्यास सुरुवात केली. मात्र, वडिल व भावाने केलेल्या जबर मारहाणीत 18 वर्षीय प्रियकराचा जागीच मृत्यू झाला. पोलिसांना या घटनेबाबत सूचना मिळताच ते घटनास्थळी पोहोचले. त्यानंतर लगेचच तरुणाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी सरकारी रुग्णालयात पाठवला. शवविच्छेदनाचे अहवाल मात्र, अद्याप आलेले नाहीयेत. 


मुलीच्या भावाला पोलिसांनी ताब्यात घेतलं असून भाऊ आणि वडील दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आले. दोघांविरोधात भारतीय दंडसहिता 302 आणि 34 या अंतर्गंत गुन्हा दाखल झाला आहे. तळोजा पोलिस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत. मात्र, या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. 


वाढदिवसात झालेल्या वादातून मित्रानेच मित्राचा केला खून


नाशिकच्या पंचवटीयेथील पेठरोड कर्नल नगरच्या आशिष रणमाळी या 17 वर्षीय युवकाची गुरुवारी रात्री हत्या करण्यात आली आहे. आशिष दशरथ रणमाळे असं हत्या झालेल्या युवकाचे नाव आहे.  ही हत्या त्याच्याच जवळच्या मित्रांनी केली असून वाढदिवसाच्या दिवशी किरकोळ कारणावरून भांडण झाले होते. हा राग मनात धरून त्याच्या इतर तीन अल्पवयीन मित्रांनी तीक्ष्ण हत्याराने आशिषची हत्या केली. या घटनेची माहिती मिळताच पंचवटी पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी कर्मचारी घटनास्थळावर धाव घेत यातील तीनही अल्पवयीन मुलांना रात्रीतून ताब्यात घेतले. 


या घटनेची अधिक चौकशी सुरू आहे. सध्या नाशिक शहरात खुनाच्या घटनेमध्ये वाढ होत असून किरकोळ कारणावरून अल्पवयीन मुलं हत्यारे काढू लागली आहे, काही दिवसापूर्वीच पेठरोड परिसरात वाहनांची मोठ्या प्रमाणात तोडफोड झाली होती ही घटना ताजी असतानाच  पंचवटीतील पेठरोड परिसरात हत्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे अल्पवयीन मुलांच्या गुन्हेगारीकडे वळण्याचा कल मोठ्या प्रमाणात वाढल्याचे दिसून येत आहे.