मुंबई : मोदींच्या आवाहनाला प्रतिसाद देत दिल्लीतील जनतेने भाजपला देशद्रोही घोषित केल्याची जोरदार टिका राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केली आहे. भाजपचा अहंकार जनतेने नाकारत विकास आणि विश्वासाला मत देत आप पक्षाच्या बाजूने निकाल दिल्याचं मतं नवाब मलिकांनी व्यक्त केलंय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आज दिल्ली विधानसभा निवडणुकीत संपत्ती, शक्ती आणि विरोध पराभूत होवून विकास आणि विश्वास जिंकल्याचे नवाब मलिक म्हणाले.


मोदींनी दिल्ली विधानसभा निवडणुकीत जनतेला देशद्रोहविरोधात मतदान करण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार दिल्लीतील जनतेने दाखवून दिले आहे असेही नवाब मलिक यांनी माध्यमांशी बोलताना म्हणाले.



राम कदमांना विश्वास 


दिल्ली निवडणुकीचा निकाल हा अटीतटीचा असून आता चित्र जरी वेगळं असेल तरी अंतिम निकालात चित्र बदलू शकेल असं मत राम कदम यांनी व्यक्त केलं. गेल्या वेळेपेक्षा यावेळी जास्त जागा मिळत असल्याचंही त्यांनी म्हटले आहे.