सांगली :  ग्रामपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात भाजपने जोरदार मुसंडी मारली आहे. येथे भाजपची ताकद वाढलेय. १३ ठिकाणी भाजपचे सरपंच बसलेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तासगाव तालुक्यातील आत्तापर्यंत मतमोजणी झालेल्या २२  पैकी भाजप १३ आणि राष्ट्रवादीची ९ गावात सत्ता आलेय. 


पाहा लाईव्ह अपडेट, इथं करा क्लिक


दरम्यान, सिंधुदुर्ग जिल्ह्यात माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या समर्थ विकास पॅनलने कमाल करुन दाखवली आहे. कोकणात राणेंनी वेगळी चूल मांडली आणि ग्रामपंचायत निवडणुकीत उडी घेतली. पहिल्याच प्रयत्नात राणेंनी बाजी मारलेली दिसत आहे.


या ठिकाणी शिवसेना आणि काँग्रेसला मोठा संघर्ष करावा लागला आहे. राणेंनी ग्रामपंचायत निवडणूक चांगली कामगिरी केल्याने राणेंचे वर्चस्व पुन्हा एकदा येथे दिसून येत आहे. सिंधुदुर्ग : जिल्ह्यात नारायण राणे गटाच्या समर्थ विकास आघाडीने अनेक ठिकाणी ग्रामपंचायतीमध्ये सत्ता काबीज केलेय.