शशिकांत पाटील, झी मीडिया, लातूर : लातूर जिल्ह्याच्या औसा तालुक्यात एका महिलेचा मृत देह अढळला आहे. दगडाने ठेचलेल्या अवस्थेत १२ जून रोजी किल्लारीयेथे हा मृतदेह आढळला आहे. पतीच्या नावे असलेल्या शेतात हा मृतदेह अढळला आहे. त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या महिलाचा विवाह गत वर्षी संदीप सागर याच्यासह झाला होता. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वर्षभरातच अशा पद्धतीने तिचा मृतदेह स्वतःच्याच शेतात बेवारस सापडल्यामुळे आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. पोलीस सुत्रांच्यामाहितीनुसार हा मृतदेह शेतात लिंबाच्या झाडाखाली बेवारस अवस्थेत पडला होता. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले.


मृताचा चेहरा दगडाने ठेचल्यामुळे मृतदेहाची ओळख पटने कठीण जात होते. शेवटी पोलिसांच्या चौकशीनंतर सदर महिलेची ओळख पटली. पतीच्या शेतात मृतदेह अढळून आला, त्याचप्रमाणे दगडही मृतदेहाच्या बाजूलाच होता. खूना मागचे मागचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.


सारसरच्या जाचातूनच हत्या झाल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. वरील प्रकरणाचा अधिक तपास किल्लारी पोलीस करत आहेत.