औरंगाबाद : राज्यसभेतील विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद आझाद यांनी रविवारी आरएसएसवर बोचरी टीका केली, यावेळी गुलाम नबी आझाद म्हणाले, ‘देशभरात सध्या असुरक्षितेचे वातावरण आहे. दलित, अल्पसंख्याक, युवती, महिला, गरीब, शेतकरी असे सारे घटक त्रस्त आहेत. त्यांना कुठेच सुरक्षितता वाटत नाही. भाजपप्रणित सरकारमुळे देशात सध्या फक्त राष्ट्रीय स्वयंसेवक संघच सुरक्षित आहे.'


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

‘फोडा आणि राज्य करा या तत्वानुसार सध्याचे सरकार वाटचाल करत आहेत. पंतप्रधान सत्तेवर येण्यापूर्वी केलेल्या सर्व घोषणा विसरले आहेत. हे सरकार फक्त टेलिव्हिजन सरकार आहे. 


टीव्हीवर भाषणं करून सरकार चालविलं जात आहे, अशी जोरदार टीका त्यांनी यावेळी भाजपवर केली. माजी पंतप्रधान दिवंगत इंदिरा गांधी यांच्या जन्मशताब्दी महोत्सवाच्या निमित्तानं ते औरंगाबादेत येथे आले होते.