बीड : फेसबुकवर भावनिक आवाहन केल्यानंतर आता भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी ट्विटर अकाऊंटवरून भाजप हे शब्दच काढून टाकले आहेत. त्यामुळे पंकजा मुंडे खरंच भाजपवर नाराज आहेत का या चर्चांना उधाण आलंय. फेसबुकवरील कालच्या भावनिक पोस्टमध्ये त्यांनी आपण १२ डिसेंबरला गोपीनाथगडावरून कार्यकर्त्यांशी संवाद साधणार असल्याचं सांगितलं होतं. आता त्या १२ डिसेंबरला कोणती भूमिका जाहीर करतात का याकडे लक्ष लागलंय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


परळी मतदार संघातून पराजय झाल्यानंतर पुढे काय करायचं? कोणत्या मार्गाने जायचं? आपल्या लोकांना आपण काय देऊ शकतो? आपली शक्ती काय? लोकांची अपेक्षा काय? या प्रश्नांवर थोडा विचार करण्यासाठी स्वतःला वेळ हवा आहे. याकरता आपण आठ ते दहा दिवस कुणाशीही संपर्क साधणार नाही, असं पंकजा मुंडे त्यांच्या फेसबूक पोस्टमध्ये म्हणाल्या.