नाशिक : येवला-कोपरगाव रस्त्यावर पिंपळगाव जलाल टोकनाक्यावर सुरु असलेले शेतकरी आंदोलन चिघळलंय. पोलिसांनी येवल्याकडून कोपरगावकडे जाणारी वाहतूक बंद केली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आंदोलकांवर सौम्य लाठीमार करूनही आंदोलक आक्रमक असल्यामुळे घटनास्थळी राज्य राखीव पोलिस दल आणि दंगा नियंत्रण पथकाची तुकडी बोलावण्यात आलीयं. जमावाला नियंत्रणात आणण्यासाठी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडण्यात आल्यात. 


सकाळ पासून सुरु असलेल्या या आंदोलनामध्ये आंबे, डाळींब, टोमॅटो सह फळाच्या गाड्या रस्त्यावरच रिकाम्या करण्यात आल्यात. किराणा सामानाची वाहतुक करणारी वाहनेही आंदोलकांच्या तावडीतून सुटली नाही.