उस्मानाबाद : साहित्य संमेलनात झी २४ तासच्या प्रतिनिधीला पोलिसांनीच धक्काबुक्की केली आहे. परिसंवादच्या एका विषयावरून साहित्य संमेलनात गोंधळ निर्माण झाला. एका संघटनेने परिसंवादच्या विषयाला विरोध करत व्यासपीठावर पत्रक वाटण्यास सुरुवात केली. यावरूम गोंधळ निर्माण झाला. या गोंधळाचं वार्तांकन करणाऱ्या झी २४ तासच्या प्रतिनिधीला पोलिसांनीच धक्काबुक्की केल्याचा प्रकार समोर आला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या घटनेची गृहराज्यमंत्री शंभुराज देसाई यांनी दखल घेतली असून, उस्मानाबादच्या एसपींना चौकशीचे आदेश दिले आहेत.