COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ठाणे : केंद्र सरकारने सादर केलेल्या अर्थ संकल्पानंतर सर्व विरोधी पक्षांची त्यावर जोरदार टीका केली आहे. ठाण्यात राष्ट्रवादी काँग्रेसनं या अर्थ संकल्पाविरोधात पोस्टरबाजी केली आहे.


ठाण्यातील कॅडबरी जंक्शन इथं राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी भाजप सरकार विरोधात जोरदार टीका केली आहे. 


दरम्यान, हा बॅनर लावणाऱ्यांवर कारवाई केल्यास राष्ट्रवादी काँग्रेस त्यांच्या पाठीशी उभी राहील असा इशारा जितेंद्र आव्हाड यांनी दिला आहे.