बीड : बीड जिल्ह्यातील धानोऱ्याजवळ खासगी बसचा अपघात होऊन नऊ जणांचा मृत्यू झालाय. तर १२ जण गंभीर जखमी झाले आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबईहून लातूरच्या दिशेने जाणाऱ्या खासगी बसला हा अपघात झाला आहे. कडा तालुक्यातील आष्टीजवळ धानोरा घाटात अहमदनगरवरून बीडकडे जाणाऱ्या सागर ट्रॅव्हल्सचा अपघात झाला. 


चालकाचा ट्रॅव्हल्सवरील ताबा सुटल्याने बस एका अवघड वळणावर रस्ता सोडून उलटली. पहाटे साडे पाचच्या सुमारास हा अपघात झाला.