मुंबई : कोकणात पावसाचा जोर वाढला आहे. नद्यांच्या पाणीपातळीत वाढ होत आहे. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खबरदारी घेण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रायगड, रत्नागिरीमधील काही नद्यांची पाणी पातळी इशारा पातळीवर गेली आहे. रायगड, रत्नागिरी जिल्ह्यात जोरदार पावसामुळे खबरदारी घेण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. कुंडलिका नदीने इशारा पातळी ओलांडली असून अंबा, सावित्री, पाताळगंगा, उल्हास आणि गाढी या नद्यांची पाणी पातळी इशारा पातळीपेक्षा थोडे कमी आहे. 


जगबुडी, काजळी नदीचे पाणी इशारा पातळीवरून वाहत असल्याने या भागातील नागरिकांना वेळीच सूचना देणे, प्रसंगी त्यांना हलविणे तसेच जीवितहानी होऊ देऊ नये यासाठी मुख्यमंत्र्यांनी जिल्हाधिकारी तसेच जलसंपदा विभागाला सावध राहण्याच्या सूचना दिल्या आहेत.


चिपळूण येथील परिस्थितीकडेही सातत्याने लक्ष ठेवण्याचे आणि नागरिकांना वारंवार सूचना देऊन त्यांना सावध ठेवण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत.