रत्नागिरी : जिल्ह्यात पावसाची उघडझाप सुरू आहे. मंडणगड ते राजापूरच्या टोकापर्यंत हीच स्थिती आहे. गेले काही दिवस ऊन पावसाचा खेळ सुरू आहे. त्यामुळे पावसाचा परतीचा प्रवास सुरू आहे अशी शक्यता वर्तविण्यात येत होती.


या पावसामुळे जिल्ह्यात काही ठिकाणी वीजही गायब झाली आहे. अजूनही पावसाची संततधार सुरूच आहे. सध्या या पावसाची भातशेतीला आवश्यकता आहे. त्याचबरोबर उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांनाही या पावसामुळे चांगलाच दिलासा मिळाला आहे. दरम्यान गेल्या 24 तासांत जिल्ह्यात एकूण 97.40 मिमी पावसाची नोंद झाली आहे.