अहमदनगर : ऐन थंडीत अवकाळी पावसाने आज अहमदनगरमधील श्रीरामपूर शहरासह वाकडी, गणेशनगर भागाला झोडपुन काढले. अचानक आलेल्या पावसामुळे अनेकांची तारांबल उडाली. या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. पावसात काही ठिकाणी धान्य भिजले.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 श्रीरामपूर शहरात संध्याकाळच्या सुमारास पंधरा ते वीस मिनीटे रिमझीम पाऊस कोसळालय. तर वाकडी आणि गणेशनगर परिसरात काही ठिकाणी मध्यम स्वरुपाचा तर काही ठिकाणी जोरदार सरी कोसळल्या आहेत. अचानक आलेल्या पावसामुळे अनेकांची त्रेधातिरपीट उडाली होती. तर शेतकर्यांनी वाळविण्यासाठी टाकलेल धान्यही भिजले आहे.