Rajan Salvi ACB Inquiry : राज्यातील सत्तांतरानंतर ठाकरे गटाच्या (Political News) आमदारांची चौकशी करण्यात येत आहे. आमदार राजन साळवी (Rajan Salvi) यांची रायगड एसीबीने (Raigad ACB Inquiry) सलग सहा तास चौकशी केली. (Maharashtra Political News) याआधीही चौकशी करण्यात आली होती. मात्र, अधिक चौकशीसाठी पुन्हा एकदा 10  फेब्रुवारीला चौकशीसाठी त्यांना बोलावलण्यात आले आहे. दरम्यान, या चौकशीनंतर साळवी यांनी एसीबीवर आरोप केले आहेत. एसीबीला आवश्यक असणारी सर्व माहिती देऊनही त्यांचे समाधान होत नसल्याचा साळवी यांचा आरोप आहे.(Maharashtra News in Marathi)


10 फेब्रुवारीला पुन्हा होणार चौकशी


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काल शुक्रवारी आमदार राजन साळवी यांची सलग सहा तास चौकशी करण्यात आली. सहा तासानंतर आमदार राजन साळवी एसीबी कार्यालयातून बाहेर पडले. त्यांना आता 10 फेब्रुवारीला पुन्हा एसीबी अलिबाग कार्यालयात हजर राहण्याची सूचना करण्यात आली आहे. आपल्याला कितीही वेळा बोलावले तरी चौकशीसाठी हजर राहणार आहोत. संपूर्ण कुटुंबाची चौकशी केली तरीही तयार आहोत. माझ्याजवळ संबध नसलेल्या मालमत्तेची देखील एसीबी चौकशी करत आहे. तसेच एसीबीने मागवलेली आणखी माहिती 10 फेब्रुवार पर्यंत सादर करणार आहोत, असे सांगत साळवी म्हणाले, पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्यासह संपूर्ण शिवसेना माझ्या पाठीशी आहे.


याआधी साडेपाच तास चौकशी


रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर मतदार संघातील शिवसेनेचे (ठाकरे गट) आमदार राजन साळवी  काल पुन्हा रायगडच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागासमोर हजर झालेत. यावेळी त्यांची सहा तास चौकशी करण्यात आली. त्यानंतर ते एसीबीच्या कार्यालयातून बाहेर पडलेत. बेकायदा मालमत्ता जमवल्याच्या आरोपावरुन साळवी यांची एसीबी चौकशी सुरु करण्यात आली आहे. 


14 डिसेंबर रोजी साळवी पहिल्यांदा एसीबी समोर हजर राहिले. त्यावेळी त्यांची साडेपाच तास चौकशी झाली. एसीबीला आवश्यक उर्वरित माहिती आणि कागदपत्रे सादर करण्यासाठी साळवी यांनी पुन्हा एकदा पुढच्या महिन्यात हजर राहावे लागणार आहे.


'या' प्रकरणात साळवींची निर्दोष मुक्तता 


दरम्यान, भाजप नेते आणि केंद्रीय उद्योगमंत्री नारायण राणे यांच्या जनआशीर्वाद यात्रेदरम्यान पोस्टर फाडल्याचे प्रकरणी ठाकरे गटाचे आमदार आणि उपनेते राजन साळवी यांच्यावर ठपका ठेवण्यात आला होता. मात्र, या प्रकणात त्यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. साळवी यांच्यासह सहा जणांची निर्दोष मुक्तता  केली. त्यांच्याविरोधात सबळ पुरावे अभावी रत्नागिरी येथील न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली.