कोल्हापूर : सदाभाऊ खोत यांनी शेतकऱ्यांचा संप मोडून काढण्याचा प्रयत्न केला आहे आणि चळवळीचा घात केला अशी टीका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टींनी केली आहे. याप्रकाराबाबत त्यांना कार्यकारणीमध्ये योग्य जाब विचारू असंही शेट्टी म्हणालेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सदाभाऊंनी छातीवर जो बिल्ला लावला त्याच्याशी ते प्रामाणिक राहिले नाहीत. त्यांची लुडबूड आम्हाला मान्य नाही असा घणाघात राजू शेट्टींनी केला आहे. आत्ताच्या काळात सदाभाउ खोत यानी काय निर्णय घेतले, त्याच्याशी आमचा संबंध नाही असं शेट्टींनी सांगितलं.


जयाजीराव  हे २०१४ मधे स्वाभिमानी मधे यायला इछुक होते पण आम्ही त्यांना संघटनेत घेतल नाही, कारण ते विश्वासार्ह नाहीत हे आम्हाला त्याच वेळी कळालं होतं, असं वक्तव्य राजू शेट्टींनी केलं आहे. दरम्यान ५ जूनला होणाऱ्या महाराष्ट्र बंदमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटना सहभागी होणार आहे.