COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रत्नागिरी: राजापूर तालुक्यातील प्रस्तावित नाणार रिफायनरी प्रकल्पाविरोधातग्रामस्थांनी पुन्हा एकदा एल्गार पुकारला आहे. या रिफायनरी प्रकल्पाविरोधात राजापूर तहसीलदार कार्यालयावर महामोर्चा काढण्यात येतोय. भूमी कन्या एकता मंच सागवे यांच्यावतीने या धडक मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. गेले १० महिने या प्रकल्पाविरोधात इथले ग्रामस्थ लढत आहेत. भाजप वगळता सर्वच पक्षांचा या प्रकल्पाला विरोध आहे.


भाजप वगळता प्रकल्पाला सर्वपक्षीय विरोध


दरम्यान, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, मनसे अध्यक्ष राज ठाकरे, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, अशा दिग्गज नेत्यांनी या ठिकाणी येऊन प्रकल्पाच्या विरोधाचा सूर आळवला आहे. मात्र तरीही सरकारकडून हा प्रकल्प पुढे रेटण्याच्या हालचाली जोरदार सुरु आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा इथले ग्रामस्थ या प्रकल्पाविरोधात एकवटले आहेत.