पालघर: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मतदारांना आमिष दाखवून आचार संहिता भंग केली असल्याची तक्रार काँग्रेसकडून दाखल करण्यात आलीय.  सचिन सावंत यांनी ही तक्रार केली आहे. वनपट्टे मंजूर करणार, खावटी कर्ज माफ करणार,पालघरमध्ये मेडिकल कॉलेज उभारणार, शिवाय वसई विरार महानगरपालिकेतून २९ गावे वगळणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी जाहीर सभेत म्हटलंय.