सोलापूर : रयत क्रांतीचे नेते सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर बोचरी टीका केली आहे. एका खासगी कार्यक्रमानिमित्ताने सदाभाऊ सोलपूरमध्ये आले होते. यावेळी त्यांनी शरद पवार यांच्यावर निशाणा साधला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शरद पवार हे संपूर्ण महाराष्ट्रात केवळ काड्या करतात, उभं आयुष्य त्यांचं आग लावण्यात गेलं, त्यामुळे शरद पवार यांचं आडनाव बदलून आगलावे ठेवावं अशी बोचरी टीका सदाभाऊ खोत यांनी केली आहे. 


शरद पवार हे महान नेत आहेत, पण त्यांनी राज्यात काड्या करण्याशिवाय काहीही केलं नाही. एका घरात आग लावायची तिथलं झालं की दुसऱ्या घरात आग लावायला जायचं काम शरद पवार करतात, असं सदभाऊ खोत यांनी म्हटलं आहे. सदाभाऊ खोत यांच्या या वक्तव्यावरुन नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.


यशवंत जाधव यांच्या डायरीवर प्रतिक्रिया
यावेळी सदाभाऊ खोत यांनी मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव यांच्या डायरी प्रकरणाचाही उल्लेख केला. आईला काही उपहार दिलं असेल तर ते आम्ही डायरीत लिहून ठेवत नाही. आईचे अनंत उपकार असतात त्यामुळे आईला काही दिलं तर ते डायरीत कोणी लिहून ठेवत नाही असं खोत यांनी म्हटलं आहे.


पण आई वसुलदार असेल तर मात्र लिहून ठेवलं जातं, नामकरण झालेल्या मातोश्रींवर उपकार केलेलं लिहून ठेवलं जातं अशी टीकाही सदाभाऊ खोत यांनी केली आहे.