सांगली : छत्रपती उदयनराजे भोसले यांचा सातारा लोकसभा पोटनिवडणुकीत पराभव झाला, यावर कोल्हापूरचे छत्रपती खासदार संभाजीराजे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. उदयनराजे यांचा लोकसभा पोटनिवडणुकीत पराभव झाल्यानंतर संभाजीराजे यांची ही पहिलीच प्रतिक्रिया आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

संभाजीराजे म्हणाले, छत्रपती उदयनराजे यांचा बंधू या नात्याने सांगतो, 'छत्रपती उदयनराजे यांचा पराजय म्हणजे, तो आमचा पण पराजय आहे, मनापासून आम्हाला दुःख वाटतंय, पण विश्वास इतका आहे की, सुख आणि दुःख बघण्याची छत्रपती घराण्याची सवय असते, आजचा पराजय हा उद्याच विजय कसा असेल? याचा छत्रपती उदयनराजे नक्की विचार करत असतील', असं सांगलीत संभाजीराजे म्हणाले.


पद हा एक भाग आहे, मात्र छत्रपतींची पदवी ही महत्वाची असते, रयतेची सेवा करणे ही छत्रपती घराण्याची परंपरा असल्याचंही यावेळी खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी म्हटलं आहे. यापुढे राज्याच्या मुख्यमंत्रीपदी येणाऱ्या मुख्यमंत्र्यांना माझी विनंती असेल की, एक तरी कॅबिनेटची मिटिंग ही रायगडावर घ्यावी,असं संभाजीराजे यांनी सूचवलं आहे.


तसेच तसेच नवीन आमदारांना विनंती, गावाचा विकास करायचा असेल, तर प्रथम छत्रपती शिवाजी महाराज यांना समजून घ्या, त्यासाठी रायगडावर जाऊन नतमस्तक व्हा, फक्त जयजयकार करून चालणार नाही, असं देखील खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी यावेळी सांगितलं.