Maharashtra Politics: मागील वर्षभरात राज्यात मोठे राजकीय भूकंप होत आहेत. एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीमुळे शिवसेना पक्ष फुटला आहे. तर, अजित पवारांसह राष्ट्रवादीच्या आमदारांचा मोठा गट सत्तेत सहभागी झाला आहे. यामुळे शरद पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षात देखील उभी फूट पडली आहे. राज्याच्या राजकारणात धक्कादायक धक्कादायक घडामोडी घडत आहेत. त्यातच आता राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या महाराष्ट्र नव निर्माण पक्षात देखील खळबळजनक घडामोड घडली आहे. मनसेच्या मुंबईतील एकमेव नगरसेवकाने राजीनामा दिला आहे. 


मनसेच्या एकमेव एकनिष्ठ नगरसेवकानेही राज ठाकरे यांची साथ सोडली   


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे मुंबईतील एकमेव नगरसेवक संजय तुरडे यांनी पक्षाला राम राम ठोकला आहे. संजय तुरडे यांनी राज ठाकरे यांना भेटून दिला राजीनामा दिला आहे. संजय तुरडे यांनी वैयक्तिक कारणामुळे राजीनामा दिल्या असल्याची प्राथमिक माहिती सोमर आली आहे. मागील महानगरपालिका निवडणुकीमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सात नगरसेवक निवडून आलेले त्यापैकी सहा नगरसेवक हे शिवसेनेत गेले मात्र संजय तुरडे राज ठाकरे यांच्याशी एकनिष्ठ राहिले होते. 


राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र येण्याची मागणी


राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र यावं ही मागणी आता जोर धरु लागली आहे. मनसे पक्षातीलच काही नेते, पदाधिकारी यासाठी राज ठाकरेंना आवाहन करत आहेत. मुंबई पुण्यापाठोपाठ नागपुरात ठाकरे बंधूनी एकत्र यावे असे बॅनर लागले होते. आता तरी एकत्र या साहेब.. अशी हाक देणारे हे पोस्टर आहेत. राज्यातील राजकीय फोडाफोडीची परिस्थिती पाहता मराठी भाषिक जनतेवर होणारा अत्याचार थांबवण्यासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे अशी भावना व्यक्त करण्यात आली आहे. आपले हे आपले होऊ शकतात असा मनाचा मोठेपणा ठेवत एकत्र येऊन शिवशाही सरकार स्थापन करावे, असं आवाहन ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी केले आहे.


राज ठाकरेंना आम्ही थेट फोन करु शकतो - संजय राऊत


राष्ट्रवादी काँग्रेस शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी झाल्यानंतर राज्यात राजकीय घडामोडींना वेग आलाय. त्यानंतर आता राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्याच्या चर्चांनी जोर धरला आहे. यावर आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनीही मोठं विधान केले आहे. मनात आलं तर राज ठाकरेंना आम्ही थेट फोन करु शकतो असं राऊतांनी म्हटल आहे.


मनसेकडून एक सही संतापाची मोहिम


महाराष्ट्राच्या राजकारणावर सर्वसामान्य जनतेमध्ये संतापाचं वातावरण आहे.. या पार्श्वभूमीवर मनसेकडून एक सही संतापाची ही मोहीम राबवली जात आहे.  राज्यभर मनसेच्या वतीने ही मोहीम राबवली जाणार आहे. अमित ठाकरेंच्या उपस्थितीत दादर रेल्वे स्थानक इथून या मोहिमेला सुरुवात झाली. यावेळी दोन भाऊ एकत्र येण्यापेक्षा राज ठाकरे सत्तेत बसले पाहिजेत अशी प्रतिक्रीया त्यांनी दिली.