सातारा- कराड : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळी जाऊन त्यांना आदरांजली वाहिली. याच ठिकाणाहून आज राष्ट्रवादीच्या राज्यव्यापी आंदोलनाला सुरुवात झाली. 


उद्धव ठाकरेंवर शरद पवारांचा निशाणा


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यावेळी शरद पवार यांनी भाजपा आणि शिवसेनेवर टीकास्त्र सोडलं. कर्जमाफीबाबत भाजपनं शेतक-यांची फसवणूक केली असून उद्धव ठाकरे हे सत्तेला चिकटून बसले असल्याची टीका त्यांनी केली. 


मुख्यमंत्र्यांचं मत आणि शरद पवारांचा टोला


मुख्यमंत्र्यांनी समाधी स्थळावर आदरांजली वाहिल्यावर यशवंतराव यांचे विचार कुणीही अंमलात आणले नाही, असं मत व्यक्त केलं. तर हे वक्तव्य म्हणजे मोठा विनोदच आहे असा टोला शरद पवार यांनी लगावला.