शिर्डी : शेतकरी संप आज चौथ्या दिवशी ही सुरुच आहे, अहमदनगर जिल्ह्यातील राहाता,श्रीरामपुर,संगमनेर अकोले तालुक्यातील अनेक गावात बंद पाळण्यात येतोय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राहाता तालुक्यातील वाकडी गावातील शेतकरी आज चौथ्या दिवशीही आक्रमक आहे.  सकाळीच शेतक-यांनी बाजारात जाणा-या तीन ते 4 हजार लीटर दुध रस्त्यावर ओतलं. तर भाजीपाल्याच्या गाड्या अडवुन माल रस्त्यावर फेकला.  


संगमनेर तालुक्यातल्या निमगाव पागामध्येही आज बंद पाळण्यात येतोय. खंडाळ्यातही शेतकरी आक्रमक झालेयत. सरकारचा निषेध केला जातोय शिवाय पुतऴ्यांचे दहनही केले जातेय. येवढंच नाही तर पेरणी बंदचा निर्णयही इथल्या शेतक-यांनी घेतलाय.