पालघर : पालघर लोकसभा पोटनिवडणुकीत शिवसेना भाजपाचा संघर्ष टोकाला पोहोचलाय. आरोप प्रत्यारोपांचा फैरी सुरुच आहेत. भाजपने पैसे वाटप केल्याचा आरोप दुपारी शिवसेनेकडून झाल्यानंतर, आता खुद्द शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या पालघरमधल्या कार्यकर्त्यांना साम, दाम, दंड, भेद अशा सगळ्या गोष्टींचा वापर करण्याचा सल्ला दिल्याचा दावा केलाय. उद्धव ठाकरे यांनी या सभेमध्ये या ऑडिओ क्लिपची निवडणूक आयोगाने तातडीने दखल घेऊन कारवाई करावी, अशी मागणीही केली आहे.