शिवसेना नेते भरत गोगावले यांनी वादग्रस्त विधान केलं आहे. स्नेहल जगतापांबद्दल बोलताना त्यांनी वादग्रस्त विधान केलं आहे. रायगमधील कार्यक्रमात बोलताना त्यांनी स्नेहल जगताप यांच्यावर टीका करताना आक्षेपार्ह शब्दाचा वापर केला. त्यांच्या या विधानावरुन वाद निर्माण होण्याची शक्यता असून, आदित्य ठाकरे यांनी टीका केली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रायगडमधील कार्यक्रमात बोलताना भरत गोगावले यांची जीभ घसरली आहे. सांगा तुम्हाला कोण पाहिजे, काम करणारा भाऊ पाहिजे  की *** बनवणारी बहिण पाहिजे असं वक्तव्य त्यांनी केलं आहे. त्यांच्या या विधानामुळे वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. सत्ताधारी आणि विरोधक आमने-सामने येण्याची शक्यता असून प्रत्युत्तर दिलं जाऊ शकतं. 


आदित्य ठाकरेंची टीका


आदित्य ठाकरे यांनी भरत गोगावले यांच्या विधानावर टीका केली आहे. मुख्यमंत्र्यांना याबाबत लाज वाटत नाही अशा शब्दांत त्यांनी आपला संताप व्यक्त केला आहे. आदित्य ठाकरे यांनी वांद्रे येथे एका कार्यक्रमात हजेरी लावली. यावेळी त्यांना भरत गोगावले यांच्या विधानाबद्दल विचारलं.  "त्यांचं चारित्र्य पाहता भरत गोगावले यांची जीभ सातत्याने घसरत असते. त्यांच्या काखतेला रूमाल घसरत नाही. पण जीभ मात्र घसरते मुख्यमंत्र्यांना याबाबत लाज वाटत नाही," अशी टीका आदित्य ठाकरेंनी केली आहे.