मुंबई : राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी राजापूर तालुक्यातील पेट्रोकेमिकल रिफायनरी प्रकल्पाबाबत सावध असा पवित्रा घेत आम्ही जनतेसोबत असल्याचं जाहीर केलंय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रिफायनरी प्रकल्पाला ग्रामस्थांनी विरोध दर्शवत राजापूर तहसीलदार आणि प्रांत कार्यालयावर मोर्चा काढला होता. त्या मोर्चानंतर शिवसेनेने सावध अशी भूमिका या रिफायनरी प्रकल्पाबाबत घेताना दिसतेय.


स्थानिकांनी हा प्रकल्प या ठिकाणी नकोच अशी भूमिका घेतल्यामुळे कदाचित शिवसेना आता जनतेसोबत जाण्याचा निर्णय घेताना दिसतोय.


रत्नागिरीचे पालकमंत्री असलेले रवींद्र वायकर यांनीदेखील आपण जनतेसोबत जाणार असल्याचे जाहीर केलंय.