रत्नागिरी : सोनू माझ्यावर भरोसा नाय काय? या गाण्याने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. याच गाण्याच्या चालीवर आर जे मलिष्कानेही  बीएमसीच्या कारभाराचे वाभाडे काढले आहेत. आता मात्र, या गाण्याचा आधार घेत बेशिस्त पर्यटकांच्या डोळ्यात अंजन घालण्याचे काम तरुणींनी केलेय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मलिष्काचे मुंबय तुला बीएमसीवर भरोसा नाय काय, हे गाणे सोशल मीडियावर व्हायरल झाले. त्यानंतर मोठे राजकीय वादळ उठले. आता याच सोनू गाण्याने पर्यटकांना इशारा देण्यासाठी हे गाणे तयार केलेय.


पर्यटकांचा अतिउत्साह आणि हुल्लडबाजीमुळे आंबोलीत दोन तरुणांचा जीव गेला. एका व्हिडिओद्वारे ते सगळ्यांसमोर आलं. त्यामुळे अश्या पर्यटकांनी स्वतःला आवर घालण्याची गरज निर्माण झालीय. 



कोकणात पर्यटनासाठी नक्की जा मात्र शिस्तीच भान ठेवा, असं आवाहन देखील करण्यात येते आहे. यावरच काही महाविद्यलयीन तरुणींनी बेशिस्त पर्यटकांच्या डोळ्यात अंजन घालण्यासाठी बनवलेलं सोनूच्या तालावरील या गाण्याचे कौतुक होत आहे.