मुंबई : राज्यातील ९८ हजार एसटी कर्मचाऱ्यांचा पगार झाला नसल्याने तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. जुलै महिन्याचा पगार झाला नसतांना सात तारखेला होणारा ऑगस्ट महिन्याचा पगारही झालेला नाही. त्यामुळे दोन महिने एसटी कर्मचारी आर्थिक अडचणीत सापडले आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 राज्यातील हजारो एसटी कर्मचारी आता आर्थिक संकटात सापडलेले आहेत. आधीच अनेकांना तुटपुंजा पगार असतांना आता दोन महिन्यांचा पगार न झाल्याने आता अनेकांनी मिळेल ते काम करायला सुरुवात केली आहे. त्यातच राज्यात एसटी सेवा सुरू झाल्याने पगार झाला नसतांना अनेकांना कामावरही हजर राहावे लागत आहे, याबाबत महाराष्ट्र स्टेट ट्रान्सपोर्ट कामगार संघटना अध्यक्ष संदीप शिंदे आणि महाराष्ट्र एस. टी. कर्मचारी सरचिटणीस श्रीरंग बर्गे यांनी नाराजी व्यक्त केली आहे. 


राज्यातल्या ९८ हजार एसटी कर्मचाऱ्यांचा पगार रखडला आहे. जुलै महिन्याचा पगार झाला नसताना ७ तारखेला होणारा ऑगस्टचा पगारही रखडलाय. त्यामुळे राज्यातले हजारो एसटी कर्मचारी संकटात सापडले आहेत. त्यातच पगार झाला नसतानाही अनेकांना कामावर हजर राहावे लागत आहे. राज्यात सेवा द्यायची आहे, पण कर्मचाऱ्यांना पगार देणे शक्य नाही, अशा अवस्थेत एसटी महामंडळ सापडले आहे. राज्य सरकारने अनुदान द्यावे आणि महामंडळाची आर्थिक कोंडी सोडवावी अशी मागणी कर्मचारी संघटनांनी केली आहे.