रत्नागिरी :  सत्तेत असूनही भाजपकडून शिवसेनेला काडीचीही किंमत नाही. सरकारमध्ये असलेली शिवसेना एवढी दुर्लक्षित आहे की लाभार्थींच्या जाहिरातीतही त्यांना स्थान नाही, अशी बोचरी टीका राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दोन दिवसांच्या रत्नागिरी दौ-यावर आल्या असता, चिपळूण तालुक्यामधल्या सावर्डे इथं त्या बोलत होत्या. हिम्मत असेल तर शिवसेनेनं सत्ता सोडावी आणि सामान्य माणसासाठी रस्त्यावर उतरावं असं आवाहनही त्यांनी यावेळी केलं.