Sushma andhare : शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी कृषीमंत्र्यांवर हल्लाबोल केला आहे.  ज्या माणसाकडे राज्य उत्पादन शुल्क विभाग आहे तो बाबा विधानभवनात तंबाखू खातो असं म्हणत सुषमा अंधारे यांनी  कृषीमंत्र्यांवर हल्लाबोल केलाय. फक्त कृषीमंत्रीच नाही तर मंत्री मंडळातील सर्वच खात्याच्या मंत्र्यांवर सुषमा अंधारे यांनी टीका केली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ज्याला कृषीमंत्री केलं त्याला शेतीतलं काय कळत, त्याला कुळव कळत नाही किंवा काहीच कळत नाही आपलं राज्याच मंत्रिमंडळ लाय भारी आहे. एवढा वेळ झाला आहे बाबा सहनशील आहेत आम्हाला ऐकून घेत आहेत. 


राज्याच सरकार अस्थिर करण्याचं काम जर ग्रह खात्याकडून होत असेल तर अवघड आहे. आताच्या आरोग्य मंत्र्यांना आरोग्य व्यवस्था बदल विचारलं पाहिजे की असे का? फडणवीस आणि शिंदे हे तेच दोन लोक आहेत जे रंगा बिल्लाच्या सांगण्यावरून राज्य अस्थिर करत आहेत. 


यांची ना लाडकी बहीण योजना आहे ना लाडकी भाऊ योजना आहे यांची लाडकी खुर्ची योजना आहे. आरोग्य मंत्र्यांचे आर्थिक व्यवहार तपासा, आरोग्य सचिव कसे बसवले जातात? पुण्यातल्या आरोग्य व्यवस्था यांनी वाटोळं करून ठेवल आहे. ससून मध्ये रक्त बदलतात किडनी बदलतात हे वाईट आहे.  रुग्णालयात ड्रग्स च रॉकेट सापडत आहेत हे दुर्दैव आहे.  आरोग्यमंत्री भारी माणूस आहेत.  एखादा आजार पाण्यामुळे होतो का डासांमुळे हेच त्यांना कळत नाही. जेवढे मृत्यू करू नका काळात झाले नसतील तेवढे मृत्यू आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्या काळात झाले आहेत. आरोग्य खात्याचा खेळ मांडून ठेवला आहे अशी टीका सुषणा अंधारे यांनी केली आहे. 


काल भाजपने रॅप प्रसिद्ध केला आहे तो इतका गलिच्छ आहे. हे फडणवीस साहेबांना माहिती नसेल का फडणविस साहेब तुम्ही सध्या महाराष्ट्र भाजपच्या टार्गेट वर आहात तेच तुम्हाला राज्यातून आउट करतील.  राज्यात जाती पतींमध्ये विष कालवायचं काम देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे,आता त्यांचे माणस हेच काम करत आहेत.