उस्मानाबाद :  शेतातील विजेचा डीपी दुरुस्त करून  बसविण्यासाठी शेतकऱ्यांकडून १ लाख रुपयांची लाच घेताना महावितरणच्या सहायक अभियंत्यासह २ जणांना लाचलुचपत विभागाने रंगेहात पकडून अटक केली आहे. 


दीड लाख रुपयांच्या लाचेची मागणी


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तुळजापूर तालुक्यातील होर्टी गावात  द्राक्ष उत्पादक शेतकऱ्याच्या शेतातील बोअर वेल विजेचा डीपी नादुरुस्त असल्याने गेल्या ६ महिन्यापासून बंद आहे.हा डीपी दूरुस्त करण्यासाठी महावितरणच्या अधिकाऱ्यांनी दीड लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली.


महावितरणचा सहायक जाळ्यात


त्यानंतर पहिला १ लाख रुपये लाचेची हप्ता मुरूम मोड येथे घेताना महावितरणचा सहायक अभियंता सुधीर बुरनापल्ले , वरिष्ठ तंत्रज्ञ सरदार खान पठाण व खासगी इलेक्ट्रिकल गुत्तेदार पांडुरंग सिद्धराम जाधव या तिघांना अटक करण्यात आली.