ठाणे : ठाण्यातल्या मीरा भाईंदरच्या काजूपाडा रस्त्यावर गॅस भरलेला टँकर उलटला आहे. त्यामुळे घोडबंदर रोडवरची वाहतूक ठप्प झाली आहे. हा गॅस टँकर बाजूला काढण्याचं काम सुरु आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दरम्यान वायू गळती होत असल्यानं, खबरदारीचा उपाय म्हणून नवी मुंबई तसंच ठाण्याकडून मुंबईकडे येणारी आणि जाणारी वाहतूक पोलिसांनी थांबवली आहे. 


त्यामुळे ऐन गर्दीच्या वेळी चार ते पाच तास इथली वाहतूक ठप्प राहणार असल्याचं सांगण्यात आलंय. वायू गळती रोखण्यासाठी तसंच परिसर निर्धोक करण्याकरता, उरणहून तज्ज्ञांच्या पथकाला पाचारण करण्यात आलंय.